निवडणुक येण्याची क्षमता हाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटासाठी निकष,महायुतीचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेणार – सूरज चव्हाण

धुळे शहर

राज्यात अजित पर्व, युवक सर्व अभियान राबविले जात आहे.त्याद्वारे युवकांना राष्ट्रवादीशी जाेडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.आगामी काळात हाेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दिसेल असे राष्ट्रवादी अजित पवार युवक काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सांगितले.
अजित पर्व, युवक पर्व अभियानानिमित्त कुसुंबा येथे हाेणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सूरज चव्हाण शहरात आले हाेते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यांच्या समवेशत माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, युवक काॅग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सारांश भावसार, नव्याने पक्षात प्रवेश करणारे प्रा.शरद पाटील, अनिल मुंदडा, कुणाल पवार आदी उपस्थित हाेते. याप्रसंगी सूरज चव्हाण यांनी सांगितले की, जळगांव, नंदुरबार येथे अभियान राबविण्यात आले. आज धुळे जिल्ह्यात कुसुंबा येथे अभियानांतर्गत सभा हाेत आहे. या अभियानातून राष्ट्रवादीबराेबर युवकांना जाेडण्याचा प्रयत्न हाेईल. तसेच पक्षबांधणी करून सदस्य नाेंदणीचा आढावा घेतला जाईल.तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बुथलेव्हरल कार्यकर्त्यांना टाॅर्गेट दिले जाईल असे सांगितले.त्यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दिसून येईल.
दरम्यान, भाजपाच्या पुढाकारातून निघणाऱ्या सैनिकांच्या सन्मान रॅलीत राष्ट्रवादीचेही पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी हाेतील. देशहितासाठी पक्ष सर्वांबराेबर आहे.त्याठिकाणी काेणताही मानपानाचा प्रश्न निर्माण हाेत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचा अंतिम निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेतील…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक स्वबळावर लढण्याबाबत आमदारांच्या निर्णयाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना श्री.चव्हाण यांनी सांगितले की,स्थानिक कार्यकर्त्यांचे मनाेबल वाढविण्यासाठी नेते असे वक्तव्य करत असतील. परंतु महायुतीत निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय हा तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून घेतली. ताे सर्वांना मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

युवकांच्या उमेदवारीची मागणी, निवडून येण्याची क्षमता निकष…

राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवकांना अधिक प्राधान्य द्यावे, त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आपण अजित पवार यांच्याकडे करणार आहाेत.परंतु निवडून येण्याची क्षमता हाच निकष ठेवून तिकिटे दिले जातील असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. तसेच आगामी काळात अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *