धुळे पोलिसांनी पकडली बीड मधील
पाच सराईत चोरट्यांची टोळी
धुळे जिल्हा
धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबी पथकाने धुळे तालुका येथील एका चोरीच्या घटनेचा यशस्वी तपास करीत सराईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात पाहिजे असलेले बीड जिल्ह्यातील ५ आरोपींना अटक केली आहे. यांच्या प्रत्येकावर ३० च्या वर गुन्हे महाराष्ट्र भर दाखल आहेत. घरांच्या खिडक्याना लावलेले लोखंडी ग्रीन काढून घरात प्रवेश करुन हे चोरटे चोर्या करतात यामुळे खिडकी गँग म्हणून ही टोळी कुप्रसिध्द आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री महिंदळे शिवारातील रघुनाथ राजाराम सोनार यांच्या घरातून लग्नासाठी जमविलेले सोन्याचे दागिणे, रोख रक्कम असा १२ लाख ७८ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला होता.
याप्रकरणाचा तपास करीत असतांना एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पथकाने लळींग टोल नाका येथून संशयीतपणे जाणार्या कारची माहिती फास्टॅगशी लिंक असलेल्या मोबाईलचा नंबर मिळवून तसेच ६०० मोबाईल क्रमांक, सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेज आणि २० टोल नाक्यावर विश्लेषण करुन तो नंबर तंत्रशुध्द व निपुणतेने तपास करुन शेख अशफाक शेख आसिफ, आगामिर खान जहागिर खान पठाण, फिरोज रेहमान शेख, ऐफाझ शेख अनिस शेख, शेख कलीम शेख अलीम सर्व रा. बिड यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३१ हजाराचे ५ मोबाईल, २ हजाराची रोकड, ४ लाखाची कार असा एकुण ४ लाख ३३ हजार ३०० रुपयंाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चोरी केलेले ११ लाखा ३३ हजार ६६ रुपयांचे दागिणे सुध्दा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.