बारावीच्या निकालात नाशिक विभागात धुळे जिल्हा प्रथम
२३ हजार ८९२ परिक्षार्थी उत्तीर्ण, ९७.३० टक्के मुली पास
धुळे जिल्हा
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ५ मेसे दुपारी एकला ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. नाशिक विभागात धुळे जिल्ह्याचा सर्वाधिक ९६.७५ टक्के निकाल लागला आहे. यात १३ हजार ९२६ मुले तर ९ हजार ९६६ असे एकूण २३ हजार ८९२ परिक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये ९६.६२ टक्के नियमित तर ९६.०१ टक्के खासगी परिक्षार्थीचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९८.२४ टक्के निकाल शिरपूर तालुक्याचा लागला आहे. त्या पाठोपाठ धुळे शहरी विभागाचा ९७.१३, धुळे तालुका ९६.८०,९६.३० साक्री, तर शिंदखेडा तालुक्याचा ९५.०४ टक्के निकाल लागला आहे. धुळे तालुका ५ हजार ५१५, साक्री ४ हजार <span;>९२१, शिरपूर ३ हजार ८६०, शिंदखेडा ३ हजार ३९६ तसेच धुळे शहर ५ हजार ८६९ परिक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ९७.३० टक्के मुली उत्तर्णी झाल्या आहेत. त्या तुलने मुलांचे प्रमाण ९६.३६ टक्के आहेत. विज्ञान शाखेचा जिल्ह्याचा <span;>निकाल ९८.९७ टक्के, कला ९३.५३, वाणिज्य ९८.०१, किमान कौशल्य ९३.५७ निकाल लागला आहे.
११ फेब्रुवारी ते १२ मार्चदरम्यान झालेल्या बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील १३ हजार ८२१ मुले तर दहा हजार ७३८ मुली अशा एकूण २४ हजार ५५७ विद्यार्थी प्रतिष्ठ झाले होते. निकालाआधी विद्यार्थ्यांसह पालकांची चांगलीच धाकधूक वाढली होती. निकाल पाहण्यासाठी व प्रिंट काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेंवर मोठी गर्दी केली. अनेकांनी मोबाईलवरच निकाल पाहिला. उत्कृष्ट निकाल हाती येताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला, तर पालकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे