धुळे
धुळे जिल्ह्यातील नरडाणा-बोरविहीर रेल्वे मार्गाचे काम शेतकर्यांनी बंद पाडत भूसंपादित जमिनीचा ताबा देण्यास नकार शेतकर्यांनी विरोध दर्शवला आहे. धुळे तालुक्यातील दापोरा गावात बाधित शेतकर्यांनी एकत्र येत जादा मोबदल्यासह विविध मागण्यांसाठी रेल्वे मार्गाच्या कामाला विरोध केला.
२७ मार्च रोजी प्रांतधिकारी रोहन कुवर हे दापुरा (ता. धुळे) शिवारातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी आले असता त्यांनी रेल्वेच्या अधिकार्यांना शेतजमिनीचा ताबा देत का देत नाही याची कारणे विचारली.
शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार ज्या शेतजमिनी या बागायत असून त्यांचा शेतात विहीर आहे सातबार्यावर विहीर आहे त्या शेतकर्यांना कोरडवहू म्हूणन दर देण्यात आला आहे.
मोबदला हा हेक्टरी देण्यात आला असून तो योग्य पद्धतीच्या मापदंडाच्या आधारावर देण्यात यावा,निवाडा करत असताना जाणीव पूर्वक जास्त किमती असलेल्या शेतजमिनीचे खरेदया वगळण्यात आले आहेत ते पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात यावेत, मोबदला हा दुप्पट दिला असून तो चौपट देण्यात यावा
या संदर्भात (१४ मार्च २०२२ रोजी, मुंबई, विधानसभा)मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे है भाषण बघा समृद्धी महामार्गतील शेतकर्यांना ४ पट मोबदला आणि रेल्वे मार्गातील शेतकर्यांना फक्त दुप्पट मोबदला तोही ज्याठिकाणी ३-४ कोटी रुपये बाजारभाव असून त्याठिकाणी फक्त ४-५ लाख रुपये एकरी भाव देण्यात आला आहे.वरखेडी पिंपरी बाळापूर ही गावे महापालिकेच्या हद्दीत असून तसेंच महामार्गलातची गावे आहेत.
निवाडा करताना या गावातील ३ कोटी रुपये एकरी खरेदी असलेले व्यवहार जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. सदरील व्यवहार है सभाव्य अकृषक क्षेत्र तसेच महामार्गलगतंच असल्याने कारण देऊन ते वागळण्या आले आहेत.
शासनाने सर्व निवाडे है सर्व शेतकर्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या सोयीनुसार केले आहेत त्यामुळे ५०० शेतकरी कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यावेळी शेतकरी रेल्वे संघर्ष समितीचे जयेश चौधरी, अनिल विश्राम पाटील, दापुरा सरपंच प्रताप पाटील सोनगीर जिल्हा परिषद प्रतिनिधी ज्ञानेश्वर भिका चौधरी, प्रल्हाद गंगाराम पाटील, भागवत घमनलाल पाटील, तुकाराम भिका
चौधरी, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शांतू भाई पटेल, आत्माराम पाटील, रमेश भिका चौधरी, आनंदा बळीराम पाटील, सतीश झावरू पाटील, युवराज भोजराज पाटील, किरण निंबा पाटील, प्रकाश विश्राम पाटील, पांडुरंग देवाजी
पाटील, संजू भाऊसाहेब, अशोक आधार पाटील, माळीचे शेतकरी भाऊसाहेब पाटील, सुरेश भिका चौधरी व धुळे ग्रामीण मधील कापडणे, दापुरा-दापुरी, सोनगीर, बाळापूर, वरखेडी, पिंपरी, वडजाई, सौदाणे, सावळदे, धमाने, सरवड, बिलाडी आणि शिंदेखेडा तालुक्यातील माळीच येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.