तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगिन विकास व्हावा- स्वामी माधवानंद सरस्वती यांची पत्रकार परिषदेत मागणी
धुळे जिल्हा
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र खर्ची हे (सिध्दचंद्रवट) सप्तशृंगी देवीचे माहेर आहे. त्याचा पुराणात उल्लेख असून अनेक पुरावे देखील आहेत. मात्र हे क्षेत्र आज विकासापासून दुर आहे. भाविकांना देवीचे माहेर कळवे. या क्षेत्राचा विकास व्हावा, अशी ओम माधवानंद नर्मदेश्वर धाम ट्रस्टची मागणी असल्याची माहिती महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आज स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खान्देशातील श्री क्षेत्र खर्ची या स्थळाची महती सांगितली. सप्तश्रृंगी देवीच्या अवताराला आज 9 हजार वर्ष पुर्ण झाले आहेत. याच ठिकाणी शिवपार्वतीचा एकल्प गौप्य वास आहे.
अष्टभैरवांचेनिमित्त आदिशक्ती वज्रेश्वरीचा जन्मही याठिकाणीच झाला आहे. वज्रेश्वरीच्या रक्षणार्थ व महिषासुराच्या वधार्थ माता पार्वतीने येथेच सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला होता. त्यामुळे हे क्षेत्र खान्देचाचा गौरव आहे. क्षेत्राचा महिमा देशभरात पोहचावा, यासाठी या क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी रस्ता, पुलासह सभामंडप, भाविकांसाठी भक्त निवास, अन्नक्षेत्र, तिर्थकुंड लाईट आदी कामे होणे आवश्यक असल्याचेही यावेळी स्वामी माधवानंद सरस्वती यांनी सांगितले.