धुळ्यातील रोकड प्रकरणाची एसटीआयटी चौकशी ; दूध का दूध – पाणी का पाणी झाले पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या कोट्यवधीच्या कॅश प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा अखेर केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधीमंडळाची कोणतीही समिती कुठे जात असेल आणि त्यांच्यावर प्रश्न निर्माण होत असतील तर आमचे कर्तव्य आहे की दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. म्हणून आम्ही धुळे शासकीय विश्रामगृह प्रकरणी एसआयटी स्थापन करत तपास करणार आहोत. याबद्दल विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापतींना एक समिती बनवून या सर्व गोष्टीचा तपास करावा. अशी मागणी करणार आहे. ज्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होईल तिथे कारवाई केली जाईल. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हस्तगत रोकड ट्रेसरीत जमा,
आयकर विभागही करणार तपास

दरम्यान, गुलमोहर कॅश प्रकरणात धुळे पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
रेस्ट हाऊसच्या खोलीतून जप्त करण्यात आलेली रोकड ट्रेसरी मधे ठेवण्यात आली असून एडिशनल डायरेक्टर इनकम टैक्स ( तपास) ,नाशिक यांच्या कडे  संबंधित बाबी तपासण्याकरिता कळवण्यात आले आहे . त्या नुसार पुढील कारवाही करण्यात येईल. तसेच याप्रकरणी  BNSS कायदा कलम 173(3)अन्वये चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीची चे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *