अमृत भारत स्टेशन योजनेतून धुळे रेल्वे स्थानकाचा कायापालट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, धुळे शहरात कार्यक्रम
धुळे जिल्हा
अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत करण्यात आलेल्या धुळे रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास आणि सुशोभिकरणाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त धुळे रेल्वे स्टेशनवर विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
धुळे रेल्वे स्थानक स्वातंत्र्यपुर्व काळापासून अस्तित्वात असून येथे गेल्या ५० वर्षात फारसा बदल झालेला नव्हता. त्यामुळे धुळे रेल्वे स्टेशनचे आधुनीकरण, एकात्मिक वाहतूक आणि उच्च दर्जाच्या प्रवासी सुविधा मिळाव्या असा आग्रह शासनाकडे केला जात होता. त्यानुसार धुळे स्टेशनचा अमृत भारत योजनेत समावेश करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी धुळे रेल्वे स्थानकाचे पुनर्विकासाची पायाभरणी केली होती. त्यात एकूण निधी ९.१३ कोटी मंजूर करण्यात आला होता. यामध्ये धुळे रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधांसह खालील लक्षणीय सुविधा वाढविण्यात आल्या. या विकास कामांमुळे धुळे रेल्वे स्टेशनचे रुप पुर्णपणे पालटून गेले आहे. अतिशय भव्य असे रेल्वे स्टेशन तयार झाले असून तेथे प्रवाशांसाठी विविध सुविधा सुध्दा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
यात प्लॅटफॉर्मवर नवीन सीओपी चे काम, पुरुष आणि महिलांसाठी सामान्य शौचालये, दिव्यांगजन शौचालय, प्लॅटफॉर्मवर व फिरत्या क्षेत्राचे नवीन फरशी, नवीन व्हाआयपी कक्ष, रेल्वे कर्मचार्यांसाठी सर्व कार्यालयाचे नुतनीकरण, जनरल वेटिंग हॉल, कमांडर वेटिंग रूम, प्रवेश आणि निर्गम गेट, रेल्वे गाड्यांची घोषणा प्रणाली, साईनेज बोर्ड, कोच इडीकोर, ट्रेन इन्फोर्मेशन सिस्टिम बोर्ड, हेरीटेज नॅरो गेज कोचमध्ये नवीन बुकिंग ऑफिस, आजूबाजूच्या क्षेत्राचा विस्तार, कारंजे असलेले नवीन मोठे सुंदर बाग, फिरत्या क्षेत्रात आणि कंपाऊंड वॉलमध्ये सुंदर सजावटीची रोषणाई, स्टेशन साइन बोर्ड तसेच नवीन इलेक्ट्रिकल सब स्टेशन आणि जनरेटर अशा आधुनिक सुविधांचा समावेश आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित माजी खा. डॉ. सुभाष भामरे यांनी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव तसेच महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले. धुळे शहरातील प्रमुख रेल्वे स्टेशन इंग्राजांच्या काळापासून काहीही बदल झालेला नव्हता, येथे कोणतीही नवीन सुविधा नव्हती, त्यात बदल करण्यासाठी आपण पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती केली वेळोवेळी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपूरावा केला. त्यामुळेच अमृत योजनेत समावेश होवून ९.१३ कोटी मंजूर करण्यात आले. या निधीतून अतिशय सुंदर असे रेल्वे स्टेशन सुशोभिकरण करण्यात आले आहे. एक चांगले काम आपल्या हातून झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार अनुप अग्रवाल यांनी देखील पंतप्रधान मोदी यांचे आभा मानले.
यावेळी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापुसाहेब खलाणे, डॉ. सुशिल महाजन, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, रेल्वे विभागाचे वरीष्ठ अधिकारी अनुराग मेश्राम, धुळे रेल्वे स्थानकाचे प्रबंधक संतोष जाधव, राहुल अग्रवाल आदी उपस्थित होते.