धुळे तालुक्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी सरकार मधील लोकांना भेटावे लागते !
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर कॉग्रेस कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांचे स्पष्टीकरण
https://x.com/Kunal_R_Patil/status/1922942841824678332?t=MmYwuCP8Rds0ins4EpXCtw&s=08
मुंबई
आपल्या मतदारसंघात रखडलेल्या योजना, विकास कामे मार्गी लावण्यासाठी सरकार मधील लोकांना भेटावे लागते, असे म्हणत धुळे जिल्ह्यातील माजी आमदार आणि कॉग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे. याबाबतीत एक पोस्ट ‘एक्स’ या समाज माध्यमावर कुणाल पाटील यांच्या वतीने जारी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले माजी आमदार कुणाल पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाल पाटील प्रवेश करणार अशी अटकळ लावण्यात येत आहे परवा धुळे शहर आणि जिल्ह्यात माजी आमदार कुणाल पाटील हे पक्ष प्रवेशासाठी अजित पवारांना भेटण्यास गेले जोरदार चर्चा रंगली होती या पार्श्वभूमीवर अखेर माजी आमदार कुणाल पाटील यांनी एक पोस्ट ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करून स्पष्टीकरण दिले आहे.
दहा वर्षे आमदार असताना आणि आताही आम्ही धुळे तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना कायमच भेटत आलो आहोत… आताही कामांसाठी भेटीगाठी सुरुच आहेत….
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतलेली भेट विविध कामांसंदर्भात होती. असे या पोस्ट मध्ये कुणाल पाटील यांनी म्हटले आहे. तसेच सोबत एक व्हिडिओ सुध्दा प्रसिद्ध केला आहे.
https://x.com/Kunal_R_Patil/status/1922942841824678332?t=MmYwuCP8Rds0ins4EpXCtw&s=08
यात मा.आमदार कुणाल पाटील यांनी म्हटले आहे की , “समाजकारणामध्ये काम करत असताना माझ्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाकरता ज्या ज्या काही योजना मला राबवायच्या असतील त्याकरिता सरकारमध्ये असलेल्या लोकांना भेटल्याशिवाय त्यांच्याशी संपर्क ठेवल्याशिवाय ही सर्व कामे होऊ शकत नाही. त्यामुळे अजित दादाच नाही तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री असतील यांच्या आम्ही संपर्कामध्ये असतो आणि त्यांच्याकडून आमच्या मतदारसंघातील काम कसे मार्गी लागतील हे पाहतो. गेल्या पाच वर्षात मी आमदार असताना ज्या अनेक योजना आणि विकास कामे आपण मंजूर करून घेतले आहेत. उदाहरणार्थ आपण 18 पाणीपुरवठ्याच्या योजना या केंद्र सरकारकडून मंजूर घेतले आहेत. परंतु आजही त्यांची निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही, म्हणून मी परवाच शिंदे साहेबांना या विषयावर चर्चा करण्यासाठी भेटलो आणि असे अनेक प्रलंबित विषय तसेच अनेक रस्ते आमच्या इथे राहून गेले आहेत. छोटे छोटे पूल बांधायचे आहेत. हे सर्व करून घेण्याकरता शेवटी सरकारमध्ये असलेल्या लोकांकडे जाऊन त्यांच्याकडून काम करून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो” .
कॉग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस सह त्यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.