रवींद्रनाथ टागोर समर कॅम्पचा उत्साहात समारोप
मुला-मुलींना दिले तेजोमय संस्कार, शास्त्र व शस्त्र प्रशिक्षण
धुळे शहर
तेजोमय संस्कार, शास्त्र व शस्त्र प्रशिक्षण देणारे रवींद्रनाथ टागोर समर कॅम्पचा नुकताच धुळे शहरात उत्साहात समारोप झाला. सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ विनायक चव्हाण सर हे शिबिर 19 वर्षांपासून घेत आहे. यावर्षी हे शिबिर ज्ञानज्योती इंटरनॅशनल स्कूल संतोषी माता चौक येथे घेण्यात आले.
या शिबिरात विद्यार्थ्यांना 3 मे ते 11 मे 2025 पासून रोज सकाळी सात ते साडेअकरा या वेळेत फौजी प्रशिक्षण हॉर्स रायडिंग रायफल शूटिंग कराटे रोप मलखांब काठीलाठी चेस विटी दांडू भवरे फिरवणे इत्यादी विविध खेळांचा सराव करून घेण्यात आला. या शिबिरामध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर चारुदत्त शिंदे सिविल सर्जन नाशिक , विजुभाऊ दुग्गड कार्याध्यक्ष जैन ओसवाल बोर्डिंग धुळे, मनोज बंब सचिव जैन ओसवाल बोर्डिंग धुळे बोर्डिंग , राकेश जी बोथरा ,नाना महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
याप्रसंगी विजुभाऊ दुगड यांनी पालकांना व उपक्रम आयोजकांचे कौतुक केले व ही वास्तु शैक्षणिक कामासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ,रवींद्रनाथ टागोर समर कॅप दरवर्षी येथे घ्यावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.
तसेच याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून सौ सरला पाटील मॅडम जय हिंद हायस्कूल माजी मुख्याध्यापिका यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले व समर कॅम्प मध्ये वासुदेव यांची ओळख करून दिली त्याबरोबर बाजीराव भोजन म्हणजेच विद्यार्थ्यांनी एकमेकांना अन्न भरवले यातून सामाजिक सद्भाव हा संदेश दिला, म्हणून हा समर कॅम्प आणि त्यातील उपक्रम स्तुत्य होते असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. समर कॅम्पआयोजक विनायक चव्हाण सरांनी आपल्याला या उपक्रम घेण्याची संधी दिली त्याबद्दल जैन ओसवाल बोर्डिंग च्या कार्यकारणीचे ,पालकांचे आभार व्यक्त केले.
या शिबिराचा हेतू नेतृत्व गुण ,जास्त वेळ विद्यार्थ्यांनी कार्य करणे व गुंतवून ठेवणे, शिस्त, टीमवर्क ,देशभक्ती या विविध कलांमधून विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व विकास घडावं या हेतूने हा समर कॅम्प घेण्यात येतो असे सरांनी सांगितले.
तसेच या शिबिरासाठी विलास मराठे फौजी प्रशिक्षक, श्री प्रवीण शिरे योगा, कपिल जी व विपिन सोनवणे रायफल शूटिंग, नियुध्द राजनंदिनी, नारायण दयाल चेस व क्रिकेटचे प्रशिक्षक, आर्या चव्हाण नृत्य प्रशिक्षक,, दर्शना दीदी ,हेमांग दीदी व चेतना संजय पाटील काठीलाठी प्रशिक्षक होते.
तसेच लोकेश दयाल, भावेश पाटील मयुरेश बाबर हे मदतनीस म्हणून कार्य करीत होते. या शिबिराच्या यशस्वी नियोजन सौ सारिका विनायक चव्हाण यांनी केले.
या शिबिरामध्ये एडवोकेट चैतन्य भंडारी यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम सायबर सिक्युरिटी बद्दल जनजागृती केली तसेच डॉक्टर शितल अंशुमन पाटील यांनी विद्यार्थ्यांना दाताची काळजी कशी घ्यावी दात का किडतात जीभ व दात कसे स्वच्छ करावे याचे प्रात्यक्षिक दिले . या समर कॅम्प समारोप प्रसंगी सूत्रसंचालन श्री प्रदीप लोहार व प्रांजल लोहार यांनी केले.