परतीसाठी मदत करावी, महाराष्ट्र शासनाकडे किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती जोगी यांचे साकडे..!
धुळे जिल्हा
धुळे येथील दोन तृतीय पंथीसह किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगी असे पाच तृतीय तृतीयपंथी जम्मू कश्मीरमध्ये अडकले आहेत. जम्मू कश्मीर मधून परतण्यासाठी तूर्त कुठलीच व्यवस्था नसून महाराष्ट्र शासनाने मदत करावी अशी विनंती त्यांची एक व्हिडीओ जारी करत केली आहे. तसेच पहलगाम येथे दहशतवाद्यानी निष्पाप लोकांवर केलेल्या या भ्याड हल्याचा त्यांनी निषेध केला आहे.
दरम्यान,लवकरच परतीसाठी त्यांची सोय केली जाणार असल्याचे म्हटले जाते आहे.किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगी यांच्यासह पाच जण पहिलेगामच्या पासून ५० किलोमीटरवर थांबले आहेत.पार्वती जोगी ,साक्षी जोगी,काजल गुरु, पिंकी गुरु, कल्याणी अशी अडकलेल्या तृतीयपंथी पर्यटकांची नावे आहेत.
अतिरेकी हल्याच्या वृत्ता नंतर धुळ्यात परतण्यासाठी व्यवस्थाच होत नसल्याने तृतीयपंथीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उद्या मात्र त्यांची परतीसाठी सोय होणार असून धर्माच्या नावावर पर्यटकांना गोळ्या मारणे योग्य नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यानिमित्त उमटली.
दरम्यान, अडकलेले सर्व तृतीयपंथी सुरक्षित असून लवकरच त्यांच्या परतीची व्यवस्था केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिली गेली आहे.