घरकुल योजनेच्या प्रलंबित कामांसाठी प्रशासन ‘ॲक्शन मोडवर’ !
गृहभेट,समुपदेशनातून घरकुल कामाच्या प्रगतीसाठी गृहनिर्माण अभियंत्यांना मा आ.अमरिशभाई पटेल यांनी दिला अल्टीमेटम
धुळे जिल्हा
शिरपूर तालुक्यातील विविध योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांचे काम प्रलंबित असल्याने गृहनिर्माण अभियंत्यांना आमदार अमरिशभाई पटेल यांनी दिलेल्या सुचना व शासकीय नियमांच्या अधीन राहून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
त्यांनी अभियंत्यांना गावस्तरावर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन समुपदेशनातून कामास गती देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान घरकुलाच्या कामासाठी कुणीही पैसे मागू नयेत, मागितल्यास सबळ पुराव्यासह त्याची तक्रार पंचायत समिती किंवा जिल्हास्तरावर करण्यात यावी असे आवाहन शिरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांनी केले आहे.
<span;>सन 2016-17 ते 2024-25 या कालावधीसाठी पंचायत समिती शिरपूर अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 46,876 लक्षांक देण्यात आला होता, त्यापैकी आजपर्यंत 20,676 घरकुल पूर्ण करण्यात आले असून 20,600 घरकुल अपूर्ण आहेत. तसेच 2023- 24 या वर्षासाठी शबरी घरकुल योजनेअंतर्गत 3579 घरकुलाचे लक्षात देण्यात आले होते. त्यापैकी 909 घरकुल पूर्ण झाले असून अद्याप 2670 घरकुल अपूर्ण आहेत. सन 2023- 24 या वर्षात रमाई घरकुल योजनेअंतर्गत 763 इतका लक्षांक देण्यात आला होता, त्यापैकी 290 घरकुल पूर्ण झाले असून उर्वरित 473 घरकुल अद्याप अपूर्ण आहेत. अपूर्ण घरकुलांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणात लक्षांक बाकी असल्याचे दिसून येते, याची गांभीर्याने नोंद ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी घेणे आवश्यक आहे. सदर कामास गती मिळावी यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे त्यासाठी त्यांनी सकाळी 8 वाजे पूर्वी तसेच सायंकाळी 6 ते 8 यादरम्यान गावात प्रत्यक्ष लाभार्थी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे आवश्यक आहे.
घरकुलाच्या कामांना गती देण्यासाठी गावातील सरपंच/प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी रोजगार सेवक यासह स्थानिक प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या समवेत लाभार्थ्यांकडे भेटी देऊन सुसंवाद साधने क्रमप्राप्त आहे. परंतु याबाबत आदिवासी, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांकडून ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत, की ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियमितपणे कार्यक्षेत्रात जात नाहीत. योग्यवेळी कार्यक्षेत्रात न गेल्याने लाभार्थ्यांशी भेट होत नाही. त्यामुळे त्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेता येत नाही, ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी ग्रामस्थ लोकप्रतिनिधींच्या मार्फत करीत आहेत, या अनुषंगाने संबंधितांस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे .ग्कार्यक्रमाला गती मिळण्याच्या दृष्टीने तसेच वारंवार तक्रारी होऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच/प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवक ,इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ यांचा संयुक्त कक्ष स्थापन करून प्राप्त तक्रारींचे निराकरण स्थानिक स्तरावर करणे आवश्यक आहे. घरकुल बांधकामांना सरपंच/प्रशासक ,ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवक, गृह निर्माण अभियांता यांनी संयुक्तपणे भेटी देऊन लाभार्थ्यांची समुपदेशन केल्यास घरकुल विहित वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच नियमाप्रमाणे दिला जाणारा हप्ता देखील लाभार्थ्यांना वेळेत अदा करणे सोयीचे होणार आहे. त्या दृष्टीने गृहनिर्माण अभियंत्यांनी पूर्ण वेळ कार्यक्षेत्रात लक्ष घालून आगामी सात दिवसांत घरकुल कामात प्रगती दिसायलाच पाहिजे, असा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
यासाठी ग्रामस्थरावरून सरपंच/प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांनी नियमित सनियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, मोदी आवास योजना यामध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ देण्यात येऊ नये ,यासाठी त्याबाबतचा प्रस्तावासह सविस्तर अहवाल ग्रामपंचायतींनी पंचायत समिती घरकुल कक्षास विना विलंब सादर करावा. कुठल्याही परिस्थितीत एका कुटुंबातील एका लाभार्थ्यास लाभ मिळाल्यानंतर पुन्हा लाभ दिला जाणार नाही व शासनाचा घरकुल योजनेचा हेतू सफल होईल, गाव पातळीवर लाभार्थ्यांकडून आधार कार्ड अपडेट करून तातडीने पंचायत समिती शिरपूर कार्यालयात सादर करण्यात यावेत त्यामुळे लाभार्थ्याला विनाविलंब पहिला हप्ता देणे शक्य होईल यासाठी सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकडे कोणीही पैशाची मागणी अथवा इतर मोबदला किंवा अपेक्षा व्यक्त करत असेल तर त्याची तक्रार सबळ पुराव्यासह जिल्हास्तरावर करण्यात यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांनी केले आहे.