अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यातील २२ गावातील शेतकऱ्यांचे नुकसान

धुळे जिल्हा

अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यातील २२ गावातील २ हजार ३१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाला प्राप्त झाला आहे. अद्याप पंचनामे सुरू असून ते पूर्ण झाल्यावर किती नुकसान झाले हे स्पष्ट होईल. दरम्यान धुळे तालुक्याचे आमदार राम भदाणे यांनी शेतकऱ्यांना धीर देत नुकसानीची पाहणी केली.

पावसाचा सर्वाधिक फटका कांदा, मका या पिकांना बसला. धुळे तालुक्यातील नेर, देऊर परिसरासह परिसरात २ एप्रिलला वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. तसेच काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील २२ गावात पावसामुळे जास्त नुकसान झाले.

पावसाचा सर्वाधिक फटका कांद्याला बसला आहे. तालुक्यातील २ हजार ३१८ शेतकऱ्यांचे १ हजार ९७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यानूसार १ हजार ३०० शेतकऱ्यांचे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे, ९१६ शेतकऱ्यांच्या ७५० हेक्टर क्षेत्रावरील मक्याचे, आठ शेतकऱ्यांच्या ४ हेक्टरवरील बाजरीचे, सहा शेतकऱ्यांच्या सहा हेक्टरवरील पपई, ३२ शेतकऱ्यांच्या २६ हेक्टर क्षेत्रावरील शेवगाचे, १९ शेतकऱ्यांच्या ११ हेक्टरवरील केळीचे, १५ शेतकऱ्यांच्या ३ हेक्टरवरील आंबा, २२ शेतकऱ्यांच्या ११ हेक्टरवरील लिंबूच्या बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आ.राम भदाणे यांची ग्वाही

अवकाळी वादळी पाऊसामुळे धुळे तालुक्यातील अनेक गावात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय स्तरावरून पंचनामे करण्यात येत आहेत. नुकसाग्रस्त शेतकर्‍यांचे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असण्याची ग्वाही धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र उर्फ राम भदाणे यांनी शेतकर्‍यांना नुकसानीची पाहणीवेळी दिली आहे.
बुधवारी अवकाळी पाऊस आणि वादळमुळे अनेक धुळे तालुक्यात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. गहू, हरबरा, कांदा काढणीवर आले होते. यांचे नुकसान झाले आहे. नेर परिसरात गारपीट मुळे फळ बागायतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातले पीक खराब झाल्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मका खाली पडला आहे. आमदार राम भदाणे यांनी शुक्रवारी शासकीय महसूल आणि कृषी विभाग यंत्रणा सोबत नेर, लोहगड, लोणखेडी, अकलाड, मोराणे, देऊर,उभंड, नांद्रे, भदाणे, शिरधाने, सैताळे, लामकानी येथील शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसान पाहणी केली. यावेळी आ. भदाणे यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तात्काळ भरपाई कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना अधिकार्‍यांना आ. भदाणे यांनी दिल्या आहेत.
यावेळी माजी कृषी सभापती अरविंद जाधव,माजी जि.प.अध्यक्षा धरतीताई देवरे,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे, जिल्हा ऊपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, भाजपा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, तहसीलदार अरूण शेवाळे, गट विकास अधिकारी गणेश चौधरी,तालुका कृषी अधिकारी वाल्मीक प्रकाश,बोराडे साहेब,भास्कर जाधव,मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिवदे,पर्यावेक्षक बोरसे, कृषी सहायक चेतन शिंदे, सर्कल समाधान पाटील ,तलाठी मयूर सोनवणे, आर. डी. माळी, साहेबराव माळी, रतिलाल पाटील, वसंत माळी,एम एस ई बी चे अधिकारी पोलिस पाटील विजय देशमुख, रतिलाल वाघ, तुषार महाले, सुदाम महाजन, सागर तलवारे, सोनू बागुल, गुलाब धनगर, बापू पाटील, संजय पाटील, भाऊसाहेब पाटील, नुकसान ग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *