मुंबई
९९ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होईल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे इथं आज झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमतानं घेण्यात आला. संमेलन आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे. साताऱ्यात होणारं हे चौथं संमेलन आहे.