धुळे जिल्हयातील रखडलेल्या जल प्रकल्पांना भरघोस निधी देण्याची केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची ग्वाही

खासदार डॉ.शोभा बच्छाव यांच्या प्रयत्नांना मोठे यश..!

निधी अभावी रखडलेल्या धुळे जिल्हयातील पिण्याच्या व सिंचनाच्या प्रकल्पांना भरघोस निधी देण्याची केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची ग्वाही


धुळे जिल्हा

धुळे शहरात पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी अर्थातच तापी जलवाहिनी, अक्कलपाडा धरण भाग – २ आणि शिंदखेडा तालुक्यासाठी वरदान असलेली प्रकाशा बुराई योजना यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा. डॉ.शोभाताई बच्छाव यांनी संसदेत मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय झाले अशी माहिती देण्यात आली आहे.

२२ मे २०२५ रोजी जलशक्ती मंत्रालयाने खासदार यांनी केलेल्या निधीच्या मागणीवर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

धुळे महानगरपालिका अंतर्गत जीर्ण झालेली तापी जलवाहिनी,अक्कलपाडा भाग-२ आणि प्रकाशा बुराई योजना या सर्व प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना धुळे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप सोनवणे आणि धुळे महानगरपालिकाचे आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांना खा. डॉ.शोभाताई  बच्छाव यांनी दिल्या.या बैठकीतील प्रस्ताव सोबत घेवून  खा. डॉ. शोभा बच्छाव दिल्ली येथील बैठकीसाठी रवाना झाल्या होत्या.या बैठकीत तापी परियोजनेसह, अक्कलपाडा योजना भाग – २ आणि प्रकाशा बुराई योजना पूर्णत्वास येण्यासाठी भरघोस निधी मंजुरी बाबत सकारात्मक निर्णय झाला आहे.

धुळे शहराची वाढती लोकसंख्या आणि हद्दवाढ गावांतील समावेश यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तापी पाणीपुरवठा योजना ४० वर्षांपुर्वी कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेची पाईपलाईन जिर्ण झाल्याने तिला गळती लागली आहे. या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो. तापीतून धुळ्याला पाणीपुरवठा करणारी ४० कि.मी. लांबीची जलवाहिनी नव्याने करण्याची गरज आहे. दुसरे असे कि, अक्कलपाडा धरण पुर्ण झाले असले तरी भुमी अधिग्रहणामुळे केवळ ६५ टक्केच धरण भरले जाते. अक्कलपाडा धरण हे १०० टक्के धरण भरण्यासाठी २०० हेक्टर जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे.
शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजना वरदान ठरणारी आहे. या योजनेचे काम सुरू करून विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण करावा आणि दुष्काळग्रस्त भागाला दिलासा द्यावा अशी मागणी आहे.या योजनेमुळे अवर्षणप्रवण २८ गावांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार असून ७ हजार ८५ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. अवर्षणग्रस्त असलेला हा भाग बागायत होण्यास मदत होणार आहे. या तिन्ही कामांसाठी अनुक्रमे २२५ कोटी, ९६५ कोटी आणि प्रकाशा बुराई या योजनेच्या सुप्रमासाठी ९७३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.
दि. २२ मे २०२५ रोजी जलशक्ती मंत्रालयाने खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केलेल्या निधीच्या मागणीवर केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार श्री. सी. आर. पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत वरील सर्व योजना पूर्णत्वास येण्यासाठी व भरघोस निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे.
लवकरच हे सर्व प्रकल्प पूर्ण होवून १००% कार्यान्वित होणार असल्याची माहिती धुळे लोकसभेच्या खा. डॉ. शोभाताई बच्छाव यांनी दिली.या निर्णयाने धुळे शहरासह, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील जनतेत समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *