गडावर जाणाऱ्या पदयात्रींसाठी पाणी व सावलीची व्यवस्था करण्याचे सामाजिक संस्थांना धुळे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन
धुळे जिल्हा
चैत्र नवरात्र उत्सवानिमित्ताने धुळे व नंदूरबार जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी देवीच्या वणी गडावर निघालेल्या पायी वारीमध्ये यावर्षी हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. धुळे जिल्ह्याबरोबरच नंदूरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या भागातून अंदाजे 1 लाखापेक्षा जास्त भाविक या पायी वारीत सहभागी झाले आहेत.
या भाविकांना पिण्याचे पाणी व विसाव्यासाठी सावली उपलब्ध व्हावी, म्हणून जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, संघटना, नागरिक यांनी व्यवस्था करावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थपान प्राधिकरण नितीन गावंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
चैत्र नवरात्र उत्सवानिमित्ताने धुळे व नंदूरबार जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी देवीच्या वणी गडावर निघालेल्या पायी वारीमध्ये यावर्षी हजारोंच्या संखेने भाविक सहभागी झाले आहेत. त्यात धुळे जिल्ह्याबरोबरच नंदूरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या भागातून अंदाजे 1 लाखापेक्षा जास्त भाविक या पायी वारीत सहभागी झाले आहेत.
सध्या उन्हाचे प्रमाण खुप वाढलेले असून भाविकांना उन्ह्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता पायी चालणा-या भाविकांची पिण्याच्या पाण्याची व सावलीची सोय करणे आवश्यक आहे. भाविकांची ही वारी आज धुळे जिल्ह्यातून मार्गस्थ होत असून सुमारे 40 किमी लांब रांग लागलेली आहे. या वारीत भाविक पायी चालत आहेत. या भाविकांना ठिकठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी व विसाव्यासाठी सावली उपलब्ध व्हावी, म्हणून जिल्ह्यातील इच्छुक सेवाभावी संस्था, संघटना, नागरिक यांनी ठिकठिकाणी भाविकांसाठी सावली व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच पायी चालना-या भाविकांनी पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी सोबत असू द्यावे, उन्हात चालतांना डोक्यावर पांढरा रुमाल/कापड बांधावे, पुरेसे पाणी प्यावे, सावलीचा आधार घेत चालावे. असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नितीन गावंडे यांनी केले आहे.